रविवार, २० सप्टेंबर, २००९

शब्दवेडा
आत्ता पर्यंत आयुष्यात, एकही शब्द लिहीला नव्हता
आता अतिव दु:खानंतर, शब्दच शब्द फ़ुटला होता
अशा दु:खी भावविश्वात, नातलग मात्र होते पारखे
अस्थीर मनाच्या आधाराला, होते सोबती तुझ्या सारखे
मी कसला भावुक होतो? मन करपून गेलं होतं
तुझ्यासारख्या जिवलगांची आशेने वाट बघात होतं
जेंव्हा सखा जिवलग होतो, त्याला बोलवावे लागत नाही
त्याला तुमचे मन कळते तेंव्हा तो यायचा थांबत नाही
लेखणी माझी सखी होते तीच माझी जिवलग असते
सखी विरहाचे दु:ख डोंब घेऊन, तीच कागदावर प्रकट होते
स्वप्नं फ़क्त कवितेत असतात तिथे वास्तवाला थारा नसतो
भावनांची तार तुटली आहे, हेच काळ सांगत असतो
मनाचे घाव भरत नाहित तुटलेली तार जोडता येत नाही
गेलेलं माणूस परत येत नाही, सतार सुरात झंकारत नाही
झंझावातासारखे शब्द येतात रिकाम्या मेंदूत गर्दी करतात
आपल्या अर्थ मोहिनीचा, तिथे स्वर्ग उभा करतात
मनाला तडा गेलेला असतो, शब्द तो सांधू पाहतात
आपल्या अर्थपूर्ण मायेची त्याला मलमपट्टी करतात
कधीतरी सांधून येईल का, मनचिताच्या काचेचा तडा
जर तो तसा सांधून आला तर मी असेन शब्दवेडा



श्रीराम पेंडसे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा